दैनिक अभ्यास

माझी शाळा -माझा अभ्यास

Online Education

Class 1 st to 10 th

Breaking

शनिवार, २२ मे, २०२१

शिवपूर्वकालीन भारत /7 वी/ इतिहास

 



शिवपूर्वकालीन भारत /7 वी/ इतिहास 

             या पाठाचे काळजीपूर्वक वाचन,अभ्यास करा व यावर आधारित खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा .टेस्ट मनोरंजक असून  आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की आवडेल.  टेस्ट २० गुणांची असून १० प्रश्न आहे.



आपल्या इतिहासातील गमतीशीर महत्व पूर्ण गोष्टी

माहीत आहे का तुम्हांला ?

१)बाबरानंतर हुमायून (इ.स. १५३० ते इ.स. १५३९ व इ.स. १५५५ ते इ.स.१५५६) गादीवर आला. मुगल सम्राट हुमायूनच्या कारकिर्दीत शेरशाहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची स्थापना केली.

२)मुगल सम्राट हुमायूननंतर अकबर (इ.स. १५५६ ते इ.स. १६०५) गादीवर आला. अकबर व हेमू यांच्यात इ.स. १५५६ मध्ये पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होय. अकबर संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अमलाखाली आणण्याची त्याची इच्छा होती.

३) सम्राट अकबरानंतर जहांगीर (इ.स. १६०५ ते इ.स. १६२८) हा सम्राट झाला.

४) मुगल सम्राट जहांगीरानंतर शाहजहान (इ.स. १६२८ ते इ.स. १६५८) सम्राट झाला.

५) मुगल सम्राट शाहजहाननंतर औरंगजेब (इ.स. १६५८ ते इ.स.१७०७) हा दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले.