शिकारी,कोल्हा व वाघ
एका शिकार याने रानात एक कोल्हा
पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ
असावे अशी त्या शिकार याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे गुहा शोधून काढले व त्या बिळाच्या पुढे एक खड्डा
खोदला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झाडे झुडपे घातली व त्यावर एक मोठा
मांसाचा तुकडा ठेऊन दिला . कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून येईल व आपोआपच या खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व
तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोड्या वेळाने कोल्हा बाहेर आला
व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात
जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथेआला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या
तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकारऱ्याने
ऐकला व तो खड्याकडे पळत तेथे गेला.
जेव्हा खड्ड्यात कोल्हा पडला आहे असे
समजून शिकाऱ्याने त्या खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला पकडून फाडून खाल्ले.
तात्पर्य
: अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.
