उंदराची टोपी
एकदा
एका जंगलात उंदीर जातो. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली
मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर करण्याचे ठरविले. माकड म्हणाले मी
साखर आणतो. मांजर म्हणाले मी दूध आणतो. उंदीर म्हणाला मी शेवया आणतो. तिघांनी
पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ इकडे
मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. ते अर्ध्या वाटेतूनच परत आले. त्याने सगळी
खीर खाऊन टाकली. थोडया वेळाने माकड व उंदीर आले. पहातात तो काय, खिरीचे पातेले रिकामे ! त्यांनी मांजराला
विचारले खीर कोणी खाल्ली?' मांजर म्हणाले, मला नाही माहीत. मग माकडाने एक घागर घेतली व
सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड
म्हणाले हुप हुप करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी. पण घागर काही
बुडाली नाही. "मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला 'चूं चूं करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी पण घागर काही
बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसेबसे ते घागरीवर
उभे राहिले व म्हणाले 'म्यांव म्यांव करी, वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची
मांजराला शिक्षा मिळाली.
तात्पर्य : कधीही
खोटे बोलू नये.
